Saturday, February 24, 2018
Monday, February 19, 2018
अनुभवाची गोष्ट
नमस्कार मित्रहो,
खूप दिवसांनी आज तुम्हा सर्वांशी बोलतेय. पण आज तुम्हा सर्वांना एक अनुभव सांगावा असं वाटलं.
काही दिवसांपूर्वी मी गुजरातचा प्रवास केला. या प्रवासमध्ये एक छोटासा प्रसंग घडला आणि अगदी मनाला स्पर्श करून गेला. तर घडलं असं,
मी भुज एक्सप्रेसच्या आरक्षित डब्यातून प्रवास करत होते. माझ्या बाजुला एक मध्यम वयीन काका बसले होते. प्रवासात वेळ जावा म्हणून त्यांनी खाण्यासाठी म्हणून चुरमुरे घेतले. हातातून पॅकेट सटकले आणि काही दाणे जमिनीवर पडले. खार तर तुम्ही किंवा मी असतो त्या जागी तर काय केलं असतं ? ते तसाच टाकून उरलेले दाणे पोटात गेले असते. काय बरोबर ना ? पण तुम्हांला सांगते त्या सदगृहस्थाने सगळे दाणे उचलले आणि कागदात गुंडाळून बागेत ठेवले.
तसं पाहिल तर हि अगदिच क्षुल्लक गोष्ट आहे. अन पाहिलं तर फारचं मोठी गोष्ट आहे. आपण कधीच या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत नाही. पंतप्रधानानी स्वच्छता मोहीम राबवली खरी अन खूप मोठ्या पातळीवर नेली. वाटलं सुद्धा कि आता भारत सुधारेल पण तसं झालं नाही. अन हा सुधार अचानक होणार हि नाही जोपर्यंत आपण आपल्या ह्या अश्या छोट्या सवयी बदलत नाही. आपल घर स्वच्छ राहावं म्हणून आपण किती प्रयत्न करतो पण आपला परिसर ,आपला देश स्वच्छ रहावा हि आपली जबाबदारी नाही का ? अन आपण त्यासाठी तेवढीच मेहनत घ्यायला नको का ?
आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी महाराजांना अपेक्षित असं स्वराज्य घडवुया. प्रत्येकानं जर त्यांचा खारीचा वाटा उचलला तर नक्कीच स्वराज्य घडेल. अगदीच महाराजांचा स्वराज्य आणि हाच असेल शिवजयंतीचा उत्सव. तुम्हा सर्वाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
खूप दिवसांनी आज तुम्हा सर्वांशी बोलतेय. पण आज तुम्हा सर्वांना एक अनुभव सांगावा असं वाटलं.
काही दिवसांपूर्वी मी गुजरातचा प्रवास केला. या प्रवासमध्ये एक छोटासा प्रसंग घडला आणि अगदी मनाला स्पर्श करून गेला. तर घडलं असं,
मी भुज एक्सप्रेसच्या आरक्षित डब्यातून प्रवास करत होते. माझ्या बाजुला एक मध्यम वयीन काका बसले होते. प्रवासात वेळ जावा म्हणून त्यांनी खाण्यासाठी म्हणून चुरमुरे घेतले. हातातून पॅकेट सटकले आणि काही दाणे जमिनीवर पडले. खार तर तुम्ही किंवा मी असतो त्या जागी तर काय केलं असतं ? ते तसाच टाकून उरलेले दाणे पोटात गेले असते. काय बरोबर ना ? पण तुम्हांला सांगते त्या सदगृहस्थाने सगळे दाणे उचलले आणि कागदात गुंडाळून बागेत ठेवले.
तसं पाहिल तर हि अगदिच क्षुल्लक गोष्ट आहे. अन पाहिलं तर फारचं मोठी गोष्ट आहे. आपण कधीच या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत नाही. पंतप्रधानानी स्वच्छता मोहीम राबवली खरी अन खूप मोठ्या पातळीवर नेली. वाटलं सुद्धा कि आता भारत सुधारेल पण तसं झालं नाही. अन हा सुधार अचानक होणार हि नाही जोपर्यंत आपण आपल्या ह्या अश्या छोट्या सवयी बदलत नाही. आपल घर स्वच्छ राहावं म्हणून आपण किती प्रयत्न करतो पण आपला परिसर ,आपला देश स्वच्छ रहावा हि आपली जबाबदारी नाही का ? अन आपण त्यासाठी तेवढीच मेहनत घ्यायला नको का ?
आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी महाराजांना अपेक्षित असं स्वराज्य घडवुया. प्रत्येकानं जर त्यांचा खारीचा वाटा उचलला तर नक्कीच स्वराज्य घडेल. अगदीच महाराजांचा स्वराज्य आणि हाच असेल शिवजयंतीचा उत्सव. तुम्हा सर्वाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Subscribe to:
Posts (Atom)