Thursday, October 29, 2015

मुंबई

मुंबईला मायानगरी म्हणतात ते उगाच नव्हे, याचा अनुभव मी गेले काही दिवस घेतेय. हि मायानगरी सगळ्यांची स्वप्नं पूर्ण करते असं म्हणतात. आणि खरच आहे, किती लोक स्वतःची सगळी स्वप्नं घेऊन मुंबईत येतात. पण हि मायानगरी कोणालाच दूर लोटत नाही. प्रत्येकाला स्वतःत सामाऊन घेते. त्यांना त्यांची स्वप्नं पूर्ण करायची संधी देते.
अशीच मी हि अनेकांपैकी एक. स्वतःच नशीब आजमवयला म्हणून मुंबईत आलेय. पु. ल. देशपांडे म्हणतात की मुंबईकर व्हायचं असेल तर फक्त घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालता आल पाहिजे. अन ते अगदी तंतोतंत बरोबर आहे. मुंबई ओळखलीच जाते ती तिच्या सतत धावत्या जीवनमानासाठी. अस म्हणतात की मुंबई कधीच झोपत नाही. मुंबईत पैसा सहज उभा करता येतो फक्त कसलही काम करायची तयारी असली पाहिजे. म्हणूनच की काय मुंबईला स्वप्नंनगरी असंही म्हणतात.
या मायानगरीत एक अदभुत शक्ति आहे, प्रत्येकाला स्वतःकडे आकर्षित करण्याची. आलेला प्रत्येक माणूस या गर्दीचा सहज एक भाग होऊन जातो. पहिल्यांदा गर्दीची वाटणारी भीती मग एक मजेचा हिस्सा होऊन जाते.
माणुसकी कुठे शिल्लक असेल तर ती मुंबईत. बॉम्बस्फोट असेल किंवा 26-11 सारखा दहशतवादी हल्ला, मुंबई तेवढ्यासाठीच स्थिर होते न पुढच्याच सेकेंडला परत आपला वेग पकड़ते. अशा कठिण प्रसंगी माणुसकिची मिसाल देत मुंबई परत पूर्ववत नव्या जोमाने उभी राहते.
मुंबई आणि समुद्र यांच तर एक विलक्षण नात आहे. दिवसभर थकून भागुन घरी येणा-या लोकाना काही विश्रांतीचे क्षण हा समुद्र किनारा देतो. आठवडी सुट्ट्यांना समुद्रकिना-यावर प्रचंड गर्दी असते. आणि समुद्र किना-यावर भेळ खाण्यात जी मजा आहे ती फाइव स्टार हॉटेल मधे नाही.
अशी हि मायानगरी आपल्यावर एवढी प्रेमाची बरसात करते पण आपण तिला काय देतो? हि मायानगरी वरच्या सगळ्या गोष्टींसाठी जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच ती कच-यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. मुंबईला सर्वात मोठी समस्या कच-याचीच आहे. कच-याच व्यवस्थापनची जबाबदारी फक्त सरकार किंवा सफाई कामगारांची आहे का? आपल मुंबईच्या प्रति काहिच कर्तव्य नाही का? फार मोठ्या गोष्टी नाही पण प्लास्टिक पिशव्यांचा कमी वापर, आणि वापर केलाच तर रस्त्यावर टाकण्याऐवजी कचरापेटीत टाकणे अशा छोट्या छोट्या क्रुतीतुन आपण आपल्या परीने मुंबईला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पहिजे. यावर नक्की विचार करा. आणि आपल्या क्रूतीतून मुंबई स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करूया.

तरी ती दोन मने अबोला पाळायची

रोज आमची भेट व्हायची
नजरेला नजर थेट भिडायची
प्रेमाची तलवार काळजात घुसायची
तरी ती दोन मने अबोला पळायची

वर्गात रोज बाजुला बसायची
चोरून चोरून जरी पहायची
कधी कधी तर नजर मिळायची
पटकन सावरून नजर चुकवायची
तरी ती दोन मने अबोला पाळायची

प्रेम दोघांचे ऊतू जायचे
ओठांवर दोघांच्या आणि फुटायचे
मनात दोघांच्या खुप वाटायचे
तरी ती दोन मने अबोला पाळायची

त्या मनाचे ठसे वाटेत उमटायचे
एवढ असूनही ते दोघ एकच मानायचे
तरी ती दोन मने अबोला पाळायची

तो तिची वाट न ती त्याची वाट रोज बघायची
एकमेकांना पाहून खुष व्हायची
इतका एकमेकांना जीव लावायची
तरी ती दोन मने अबोला पाळायची

उजाडला की दिवस दोघे ठरवायची
आज बोलून टाकूच सगळ पक्क करायची
समोर येताच शब्दच विसरायची
तरी ती दोन मने अबोला पाळायची

हि तर कथा तुम्हा ऐकवायची
म्हणून हि तर कविता बनवायची
ती तुम्ही वाचून पहायची
आवडली तर कॉमेंट करायची
मनी आठवून वाचणारी रडायची
कारण हि कविता त्यांचीच असायची

Monday, October 19, 2015

शेवटी मी तुझीच रे

शेवटी मी तुझीच रे
शेवटी मी तुझीच रे

तुझ्यातच शोधलेल सुख 
तुझ्यासोबत वाटलेलं ते दुःख  
अन संशयाने केली मी ती चूक 
अजूनही मला सलतेय रे 
अजूनही मला सलतेय रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

तुझ्या मनात होत ते प्रेम 
माझ्या मनात का नाही 
तू सोडली नाही ती साथ 
अन मी सोडला तो हात 
अजूनही तुला शोधतोय रे 
अजूनही तुला शोधतोय रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

बोलायचं होत तुला खूप 
पण मला वेळ नव्हता 
आता मात्र मी मोकळी 
पण तू जवळ नव्हता 
अजूनही आतुर आहे रे 
अजूनही आतुर आहे रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

तुझ्यासोबत रमत जगले 
तेच खरे जीवन 
आठवताच अश्रू ढाळतात 
माझे हेच नयन 
अजूनही धारा वाहतात रे 
अजूनही धारा वाहतात रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

घडला मला तुझा तो सहवास 
फुलांचा दरवळला तसा तो सुवास 
अजूनही मी घेत आहे रे 
अजूनही मी घेत आहे रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

आता धसके खाऊ लागलाय 
तो माझा श्वास 
अन तुझ्या परतण्याचा तो प्रवास 
अजूनही आस तुझी धरतोय रे 
अजूनही आस तुझी धरतोय रे 

शेवटी मी तुझीच रे 
शेवटी मी तुझीच रे 

व्यथा



आवाजाची मधुरता कानात गुणगुणते 

रुपाची सौंदर्यता डोळ्यांत लुकलुकते 

तुझ्या विना विरहाची कल्पना जीवाला तळमळवते 

तुझ्यात गुंतल्या जीवाची व्यथा स्वतःशीच भुणभुणते 

भेट

भेट तुझी माझी व्हावी एका सुनामीसारखी

सागराच्या लाटांच्या वादळी भावनेसारखी

प्रेमाची साक्ष त्या प्रेमी किना-यासारखी

ओथंबून ओंजळ सुख परी दुःख त्यांच्या विरहासारखी

Saturday, October 10, 2015

स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात

आता मात्र देवा तुलाच दोष देतात,
स्वतःवरच खापर तुझ्या नावावर फोडतात.

जगण्यासाठी हात दिलेस चांगल्या वापरासाठी,
सगळ सोडून आम्ही कामी आणलेत आपल्या स्वार्थासाठी.
उपकाराची भाषा विसरून,
तुझे गुणगान गातात,
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या नावे फोडतात.

डोळे देऊन उपकार केलेस आम्हा मानवावर,
बघणे वाचणे विसरून,
आम्ही जळतो एकमेकांवर.
दुस-यावरचा अन्याय डोळे बंद करून पाहतात.
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.

चलण्यासाठी पाय दिलेस,
केलीस उणीव कमी,
लाथ उगारण्यात आयुष्य घालवतो आम्ही नराधमी.
मदतीसाठी आमचे पाय कधीच नाही धावत,
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.

झाली सगळी रोजचीच दुःखे,
तुझ्या दारी मांडतात,
वेळेविना काहिच न घडतं,
कधीच हे न जाणतात.
हात समोर जोडून,
मनात शिव्या घालतात.
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.

हृदयासारखी सुंदर गोष्ट माणसापाशी नाही,
आहे म्हणतो आम्ही जरी,
तीचे मोल आम्हा न ठायी.
एकमेकांविषयी क्लेश भरण्यासाठी वापर करतात,
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.

भगवद गीतेत तुच आहेस यांना ठाऊक नाही,
वेळ फक्त टाइमपाससाठी आहे,
ते वाचण्यासाठी नाही,
अशी फालतू कारणे देऊन तुलाच उलट बोलतात,
स्वतःवरचे खापर देवा तुझ्या माथी फोडतात.
(कवि-केशव सावंत )

आठवणी

अश्रूंच्या सरी धाऊन आल्या,
नकळत माझ्या डोळ्यांमध्ये.

तुझ्या आठवणी जाग्या झाल्या,
नकळत माझ्या हृदयामध्ये

तुला कधी न सांगता आल्या,
शब्दच अडले ओठामध्ये.

परी शेवटी सावली उरल्या,
तुझ्या माझ्या या नात्यामध्ये.

तुला कधी न सामिल केले,
मला होणा-या वेदनांमध्ये.

तुझेच तुजला कळून चुकले
सलत राहिल्या भावनांमध्ये.

(कवि - केशव सावंत)